गझल कशी लिहावी ती मला कळलीच नाही.
विनंत्यांना माझ्या ती कधी भुललीच नाही.
भराभरा जळाले सरण संसार वणव्यात
काही ओली लाकडे यात जळलीच नाही.
होता नव्हता पसारा मांडला तिच्यासाठी
प्राक्तने का दोघांची कधी जुळलीच नाही.
माझ्याच गुंत्यात आता अडकलो मी पुरता
आयुष्याची वीण मला कधी जमलीच नाही.
1 comment:
Badiya
Post a Comment